[0:05]मित्रांनो आपण येथे पहिला पाठ स्किप केलेला आहे कारण त्यामध्ये विशेष असं काही नाही जे की आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि जे जाणून घेण्यासारखं आहे ते आपल्याला ऑलरेडी माहीत आहे.
[0:16]तर आपण युरोप आणि भारत या दुसऱ्या चाप्टर पासून या आठवीच्या इतिहासाला सुरुवात करत आहोत.
[0:24]प्रबोधनयुग: युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते.
[0:35]या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात.
[0:49]प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली.
[1:05]प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.
[1:14]प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले.
[1:23]लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले.
[1:33]इसवी सन १४५० च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.
[1:41]छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वंपर्यत पोहोचू लागले.
[1:52]इसवी सन १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी बायझंटाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात.
[2:11]तुर्कानी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले.
[2:27]लिओनार्डो-द-विंची हे प्रबोधनकाळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता.
[2:38]शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व होतेच परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला.
[2:53]त्याच्या ‘मोनालिसा’ व ‘द लास्ट सपर’ या चित्राकृती अजरामर ठरल्या.
[3:02]पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला.
[3:08]प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले.
[3:16]या संपूर्ण बदलांना ‘वैचारिक क्रांती’ असे संबोधले जाते.
[3:24]१८ व्या तसेच १९ व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड ‘क्रांतियुग’ म्हणून ओळखला जातो.
[3:33]या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला.
[3:43]इ.स. १६८९ च्या बिल ऑफ राईटसमुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले.
[3:56]अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले.
[4:06]साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.
[4:16]इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतींवर नाममात्र वर्चस्व होते. परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली.
[4:38]अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतींविरोधात युद्ध पुकारले.
[4:49]अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना ‘अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणून ओळखली जाते.
[5:05]यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासनपद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला.
[5:19]फ्रेंच राज्यक्रांती इ.स. १७८९ मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना ‘फ्रेंच राज्यक्रांती’ म्हणून ओळखली जाते.
[5:39]फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली.
[5:48]वसाहतवाद एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय.
[5:59]आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच ‘वसाहतवाद’ होय.
[6:14]युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी वृत्तीतून साम्राज्य्यवाद उदयास आला.
[6:24]ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती.
[6:33]इ.स. १६०० मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती.
[6:43]या कंपनीने जहांगीर बादशाहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे.
[6:58]इंग्रज फ्रेंच संघर्ष भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.
[7:07]या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. ती युद्धे ‘कर्नाटक युद्धे’ म्हणून ओळखली जातात.
[7:18]तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.
[7:32]प्लासीची आणि बक्सारची लढाई बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता.
[7:39]इ.स. १७५६ साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला.
[7:48]ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत.
[7:58]इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराज उद्दौैलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली.
[8:15]या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले.
[8:31]इ.स. १७५७ मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौैलाचा पराभव झाला.
[8:48]इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले.
[9:01]मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले.
[9:11]बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली.
[9:26]इ.स. १७६४ मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांचा विजय झाला.
[9:37]या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.
[9:56]इंग्रज-म्हैसूर संघर्ष म्हैसूर राज्यातील हैदरअलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले.
[10:04]हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला.
[10:10]त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला. अखेर १७९९ मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला.
[10:22]अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले.
[10:30]सिंधवर इंग्रजांचा ताबा भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले.
[10:39]रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले.
[10:51]अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि १८४३ साली त्यांनी सिंध गिळंकृत केला म्हणजेच जिंकला.
[11:09]शिख सत्तेचा पाडाव एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती.
[11:17]रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला.
[11:23]त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदून राज्याचा कारभार पाहू लागली, मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही.
[11:34]ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार, असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला.
[11:47]या पहिल्या शीख-इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले.
[11:56]पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. मुल्तानचा अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले.
[12:07]हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले.
[12:15]१८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.
[12:24]इंग्रज व मराठे मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते.
[12:29]त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती.
[12:39]माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला.
[12:53]१७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली.
[13:03]पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले.
[13:17]तैनाती फौज १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
[13:24]सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते.
[13:31]त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या.
[13:46]भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा.
[14:00]त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट (प्रतिनिधी) ठेवावा अशा त्या अटी होत्या.
[14:14]भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले.
[14:21]१८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले.
[14:40]त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.
[14:51]या युद्धात त्याचा पराभव झाला. १८४८ मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती.
[15:05]शिंधांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला.
[15:17]छत्रपती प्रतापसिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते.
[15:26]इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली.
[15:36]परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा १८४७ मध्ये मृत्यू झाला.
[15:48]छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला.
[15:58]परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.
[16:06]पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून १८४८ मध्ये सातारचे राज्य खालसा केले.



